भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महिला शक्ती जागृत करण्याचे काम मनजीत कौर गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यानिमित्ताने मोहाडी येथे पंचायत समितीच्या सभागृहात प्रमुख पाहुण्या म्हणून मनजीत कौर उपस्थित होत्या. संवादातून त्यांनी महिलांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली. की तुमच्यात किती शक्ती आहे. हे ओळखा, स्वत:ला कमकुवत समजू नका. महिला रोज नवनवीन अत्याचारांना सामोरे जातात आणि त्यांना तोंड दिल्यावर अधिक सामर्थ्यवान बनतात, हीच आपली ताकद आहे, समाज बदलण्याची ताकद आपल्यात आहे, आपण एकमेकांच्या सोबत असलो तर प्रत्येक परिस्थितीला सामथ्यार्ने सामोरे जाऊ शकतो हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच आपण एक आहोत. दुसº्याचा हात नेहमी धरा जेणेकरून एकाला कमजोर समजू नये असे प्रतिपादन समाजसेविका मनजीत कौर मतानी यांनी केले. ते महिला व बालविकास विभाग अभय केंद्र मोहाडी अंतर्गत कौटूबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ प्रशिक्षण संवाद कार्यक्रमाचे आयोजन मोहाडी येथे पंचायत समिती बचत भवनात सोमवार दि.२६ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक बालविकास अधिकारी योगिता परसमोडे होते.प्रमुख वक्ते म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार पुल्लरवार,वैद्यकीय अधीक्षक निशा भावसार,अस्मिता मेश्राम,माविमचे व्यवस्थापक वनमाला बावनकुळे, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, प्रथमश्रेणी दंडाधिकारी बी.आर.पाटील, न्यायधीश जी.बी.पवार,जिल्हा विधी सल्लागार अस्मिता खोब्रागडे, समाजसेविका अँड.मनजीत कौर मतानी, संरक्षण अधिकारी शुभांगी कोल्हे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पुढे बोलतांना मनजीत कौर मतानी या अनेक वर्षांपासून महिलांना जागरुक करत आहेत. त्यामुळे त्यांची अंमली पदार्थांच्या व्यसनातून सुटका झाली. सेक्सवर्कर्सना सन्मानजनक जीवन देणे, त्यांना कामावर ठेवणे अशा अनेक गोष्टी समाजाच्या हितासाठी केल्या आहेत. मनजीत कौर यांच्या संवादाने महिला खूप प्रभावित झाल्या आहेत. त्या म्हणाल्या की जीवन एक संघर्ष आहे. परंतु प्रत्येक दिवशी आपण सर्वजण संघर्ष करू आणि पुढे जाऊ. एक महिला संकटात असेल तर १० महिलांनी तिला साथ दिली पाहिजे आणि एकमेकांबद्दल असे प्रेम असले पा-ि हजे की कोणीही त्यांना वेगळे करू शकत नाही, असे ते म्हणाले. एखादी विधवा स्त्री असेल तर तिच्या पाठीशी ढाल बनून उभे राहा म्हणजे तिला समाजाच्या अत्याचारापासून वाचवता येईल.
स्त्रीच्या आत अफाट शक्ती असते,ती एखाद्या जीवाला जीवदान देते आणि त्या मुलाला देशासाठी तयार करते. संपूर्ण समाजातील महिला. ती प्रत्येक कामात सक्षम आहे आणि मी म्हणेन की स्त्री ही एक योद्धा आहे जी दररोज एक नवीन लढाई लढत असल्याने मत व्यक्त केले. प्रारंभी माता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. स्वागतगीत वरठी येथील सुनंदा भुरे व खुटसावरी येथील वंदना यशवंत पशीने यांनी प्रस्तुत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक राजेश गभने, संध्या माणिकराव साठवणे, सीमा बेलेकर, शंकर देशमुख यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक संरक्षण अधिकारी प्रमोद गिरीपुंजे यांनी केले. संचालन समुपदेशक वृंदा गायधने तर आभार समुपदेशक स्मिता उरकुडे यांनी केले.