
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : मकर संक्रांतीच्या दिवशी वैनगंगा नदी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मित्रांच्या टोळीतील एकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली आहे. सदर घटना बुधवार(१४) रोजी दुपारी १२.३० दरम्यान तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील नदी घाटात घडली.

मित्रांसोबत नदी पात्रात अंघोळीसाठी उतरताना पाण्याचा अंदाज चुकल्याने क्षितिज लीलाधर लांजेवार(१५, राह. तामवाडी) असे बुडून मृत पावलेल्या तरुणाचे लोकनाव असून त्याच्या सोबतीला असलेले आर्यन श्रीराम ठाकरे(१६) व रूद्र नरेश अमृते(१५) यांना वाचविण्यात स्थानिक युवकाला यश आले. घटनेच्या दिवशी मृतक व त्याचे मित्र हे१० च्या सुमारास नदीत पोहण्यासाठी गावातून घाटाच्या दिशेने निघाले होते. तत्पुरी नदी तीरावर बसून मित्रांनी फºहाडी नाश्ता केला. त्यानंतर अंघोळीच्या बेत क्षितिजच्या जीवावर बेतला. घटनेची माहिती तुमसर पोलीस तथा वैद्यकीय यंत्रणेला देण्यात आली. तोच घटनस्थळी पोहोचलेल्या यंत्रणेने पंचनामा तथा इतर सोपस्कार पार पाडून मृतक क्षितिजला उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केल्याची माहिती मिळाली आहे.
त्यांच्या करीता मनोज ठरला देवदूत
तामसवाडी येथील रहिवासी युवक मनोज देवराव केवट हा घटनेच्या वेळी नदी परिसरातच दूर उपस्थित होता. पाण्याचा अंदाज चुकताच पडीत युवकांची मदतीची आर्त हाक ऐकून केवट घटनास्थळी पोहोचला. क्षणाचाही उशीर न करता मनोजने नदी पात्रात उडी घेऊन आधी आर्यन व नंतर रूद्रला वाचविले. तिसºयांदा पाण्यात उडी घेऊन मृतक क्षितिजच्या मदतीला गोता घेणाºया मनोजला तो कुठेच दिसून आला नाही. शोधाशोध घेतला मात्र शेवटी गावात घटनेची माहिती देऊन क्षितिजचे शोधकार्य सुरू झाले. २.३० दरम्यान खोलगट पाण्यात तो मृतावस्थेत आढळला. घटनेत क्षितिज दगावला मात्र दोघांकरीता मनोज देवदूत ठरला.
सणाच्या दिवशी गावात शोककळा
तामसवाडी हे वैनगंगा नदीच्या विस्तृत पात्रालागत वसलेले गाव आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच सणात क्षितिजच्या अवेळी दगावल्याने गावात शोककळा पसरली आहे. लहान बहीण व आई-वडिलांना क्षितिज एकुलता एक होता. पोहता येत नसताना नदीत कशाला गेला. कुठे शोधू माझ्या लेकरला अश्या एकाच अक्रंतात गावात स्मशान शांतता पसरल्याचे दु:खद चित्र परसले होते.