रोघा गावात पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील रोघा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या डबक्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलांची नावे चंद्रकांत रूपचंद कुंभरे (वय ७) आणि समर्थ संजय उईके (वय ६) अशी असून, दोघेही ३१ मार्च रोजी सायंकाळपासून बेपत्ता होते. मुलांचा शोध घेण्यासाठी गावकºयांनी आणि नातेवाईकांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. दरम्यान, १ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गावाजवळील पाण्याच्या डबक्यात दोन्ही मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. ही माहिती समोर येताच गावात शोककळा पसरली. या दुर्दैवी घटनेमुळे गावकºयांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, लहान मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *