मान्सूनची वाटचाल अद्यापही संथच; शेतकºयांसमोर दुहेरी संकट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : केरळमध्ये मान्सून दाखल होऊनही त्याचा पुढील प्रवास मंदावल्याने महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, यंदा राज्यावर ‘एल निनो’च्या प्रभावामुळे दुहेरी संकट निर्माण झाले असून हवामानात तीव्र असमानता दिसून येत आहे. एका बाजूला कोकण, मुंबई व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसºया बाजूला मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या परस्परविरोधी हवामान परिस्थितीमुळे नागरिकांसह शेतकरी वर्गही चिंतेत सापडला आहे.

‘एल निनो’मुळे मान्सूनवर परिणाम

तज्ज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होते. याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होतो. यंदा ‘एल निनो’ सक्रिय असल्यामुळे मान्सूनचे वारे कमकुवत झाले असून त्यांचा वेग आणि दिशा दोन्ही प्रभावित झाल्या आहेत. परिणामी, मान्सूनची प्रगती संथ झाली आहे. त्यातच वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि वायव्येकडील अस्थिर हवामानामुळे मान्सूनच्या नेहमीच्या प्रवाहात व्यत्यय आला आहे. त्यामुळे राज्यभर एकसमान पावसाऐवजी काही भागांत अतिवृष्टी, तर काही ठिकाणी कोरडे वातावरण अशी स्थिती निर्माण झाली आहे.

१५ जूनपर्यंत राज्य व्यापण्याची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही भागांत मान्सूनपूर्व सरी कोसळतील. मुंबईपुणे परिसरात ढगाळ वातावरण राहून अधूनमधून पावसाची शक्यता आहे. समुद्र- ाकडून येणाºया आर्द्र वाºयांमुळे कोकणात पावसाचा जोर अधिक राहू शकतो.

विदर्भात उष्णतेचा तडाखा कायम

‘एल निनो’चा सर्वाधिक परिणाम विदर्भावर होत असल्याचे चित्र आहे. मान्सूनचे वारे उशिरा पोहोचत असल्याने कोरडे आणि उष्ण वातावरण टिकून आहे. १२ ते १६ जूनदरम्यान विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तापमानात लक्षणीय वाढ होऊन नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शेतकºयांना सावधगिरीचा इशारा

मान्सूनची अनिश्चितता लक्षात घेता शेतकºयांनी घाईघाईने पेरण्या करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट उद्भवू शकते. तसेच, ज्या भागांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडांखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहणे टाळावे.

एकूण चित्र चिंताजनक

एकंदरीत, राज्यात यंदाचा मान्सून सुरुवातीपासूनच अनिश्चित आणि असमान स्वरूपाचा दिसत आहे. विदर्भ व भंडारा जिल्ह्यातील परिस्थिती पाहता शेतकºयांवर मोठे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सून वेळेत आणि समाधानकारक पद्धतीने सक्रिय होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *