भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील सोमलवाडा येथील बंद असलेली बोअरवेल तात्काळ दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी गावकºयांनी सरपंचांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. सोमलवाडा येथील वार्ड क्र.३ मधील श्री.जगनाळे यांच्या घरासमोरील सार्वजनिक बोअरवेल मागील ३ ते ४ महिन्यांपासुन बंद अवस्थेत असुन नागरीकांना पाणीटंचाई भासत असुन पाण्याकरीता भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात नागरीकांनी ग्राम पंचायतीला तोंडी सुचना दिल्या असता आम्ही आमच्या मर्जीने बोअरवेल दुरूस्त करू अशी उलट उत्तरे गावकºयांना देण्यात येत आहेत. तरी गावकºयांची पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेवुन तात्काळ बंद असलेली बोअरवेल दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे. निवेदनावर राजहंस शेंडे,शुभम फंदे,रविंद्र शेंडे, अंकोश फंदे,काशिराम निर्वाण,चंद्रप्रकाश बडगे, विजय फंदे,अजय कडव,भगवान फंदे तसेच अनेक गावकºयांच्या स्वाक्षºया आहेत.