मुंबई : मला पदमुक्त करण्यात यावे, अशी इच्छा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राजभवनाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतित करू इच्छितो, अशी इच्छा नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांच्या अलिकडेच झालेल्या दौºयादरम्यान व्यक्त केली होती, असे निवेदनात म्हटले आहे.