भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यात तहसील कार्यालयाद्वारे कोतवाल पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली यात लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप लाखोरी येथील विजय सिंगनजुडे यांनी तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे केला आहे . तालुक्यातील लाखोरी येथील कोतवाल पदाची परीक्षा घेण्यात आली. लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याने ज्या व्यक्तीने कधीही अभ्यास केला नव्हता अशा व्यक्तीला गुण जास्त मिळाले व ज्यांना काही समजते अशा उमेदवारांना कमी गुण देण्यात आले असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. कोतवाल पदाच्या निवडीमध्ये आर्थिक देवाण घेवाण करण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. लेखी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.आता पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे