भंडारा : बहुजन समाज पक्षातर्फे गाव चलो अभियानांतर्गत तालुक्यातील कोथुर्णा येथे माता रमाबाई आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्रसंगी रमाबाई आंबेडकर यांच्या त्याग आणि संघर्षमय जीवनाचे स्मरण करून कार्यकर्त्यांनी महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे समतावादी विचार घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी घ्यावी तसेच भ्रष्टाचार, ओबीसी जनगणना, बेरोजगारी आदी प्रश्नांना जागविण्यासाठी जनतेत जाण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला बसप जिल्हाध्यक्ष पाम्बीर्द मोटघरे, सचिन लांजेवार, सुरेंद्र नरनवरे, नवलकिशोर लांजेवार, सत्यवान लांजेवार, चंद्रशेखर मेश्राम, करण वासनिक, बुथ अध्यक्ष शैलेश वहाणे, उपाध्यक्ष नितीन खोब्रागडे, सचिव सतिष गजभिये, निखिल भोतमांगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.