भंडारा पत्र्रिका / प्रतिनिधी गोबरवाही: १५ वर्षांपूर्वी भंडारा जिल्हा परिषद आरोग्य विभागा मार्फत पवनारखारी कालव्याच्या पलीकडे गोबरवाही गावातील तोरण टेकडा, जोडटोली अशा निर्जन जागेत सुमारे ४० लाख रुपये खर्च करून आरोग्य केंद्र बांधण्यात आले, निर्जनस्थळी बांधकाम, सुनसान परिसर यामुळे या आरोग्य केंद्राचा लाभ नागरिकांना सुरुवातीपासून मिळू शकलेला नाही, बहुतांश वेळा ते कुलूप बंदच राहते, उपकेंद्राच्या आजू बाजू ला झाडा-झुडपांचे साम्राज्य असते, त्यामुळे येथील नागरिकांना त्रास होतो. आरोग्य केंद्र व आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचा-यांचे येणे-जाणे बंद आहे.
जिल्हा परिषदेचे लाखो रुपये खर्च करूनही सर्वसामान्य जनता उपकेंद्राच्या लाभा पासून वंचित आहे, आरोग्य केंद्राची दुरवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे, आरोग्य उपकेंद्र बयाच दिवसांपासून जवळपास बंदच पडलेला आहे, जिल्हा परिषद भंडारा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे, आरोग्य उपकेंद्राच्या आवारात चांगली व्यवस्था करावी किंवा या इमारतीचा वापर अन्य काही कारणासाठी व्हावा, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य केंद्राच्या जागेची पाहणी करण्याची गरज आहे, या संदर्भात परिसरातील जिल्हा परिषद सदस्य कृष्णकांत बघेल यांनी सांगितले. उपकेंद्राच्या आवारात उत्तम व्यवस्था करण्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य पूर्ण प्रयत्न करतील.