ह्यवीरांनाह्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी ह्यमेरी माटी मेरा देशह्ण मोहीम

देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम देशभरात राबविण्यात येणार आहे. यानिमित्ताने गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी जन-भागीदारी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) बसवण्यात येणार असून अमृत वाटिका निर्मितीसाठी अमृत कलश यात्रेत देशाच्या कानाकोपºयातून दिल्लीत माती नेली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील गावा-गावांमधून माती संकलीत करून दिल्ली येथे पाठविली जाणार आहे. “माझी माती, माझा देश” या मोहिमेत जिल्हा उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रम प्रसारणादरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेची घोषणा केली होती. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत शूरवीरांच्या (वीर) स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमृत सरोवरांजवळील ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक (स्मारक फलक) उभारले जातील.

‘मेरी माटी मेरा देश’ हा भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाºया स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम असेल. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या देशव्यापी अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ हा आणखी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. शूरवीरांना आदरांजली म्हणून शिलाफलक बसवणे, मिट्टी का नमन आणि वीरों का वंदन हे ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेचे प्रमुख घटक आहेत. ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या वषीर्ही ‘हर घर तिरंगा’ अभियान आयोजित केले जाईल. या मोहिमेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आणि ती देशाच्या कानाकोपºयात नेण्यात माध्यमांची भूमिकाही आहे. या मोहिमेमध्ये आपल्या शूरवीरांच्या बलिदानाला अभिवादन म्हणून स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित शिलाफलकांची उभारणी तसेच पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम सादर केले जातील. वीरहृदयांची. गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाच्या भावनेला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. त्यामध्ये त्या भागातील ज्या शूरवीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावांबरोबर पंतप्रधानांचा संदेश असेल.

ही मोहीम १२ मार्च २०२१ रोजी सुरू झालेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विशेष आयोजनाच्या समारोपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतभरात २ लाखाहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. देशभरातील जनतेने यात व्यापक लोकसहभाग (जनभागीदारी) नोंदवला आहे. ९ ते ३० आॅगस्ट २०२३ दरम्यान ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक शहरी संस्था तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचा समावेश असेल. दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपºयातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतिक असेल. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन-भागीदारी)https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून लोकं माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील.

या कृतीतून लोकं भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाºयांप्रती आदर व्यक्त करणे यावर लक्ष केंद्रित करून पंच प्रणांची प्रतिकात्मक प्रतिज्ञा घेतात. अशा प्रकारे राष्ट्र प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाईटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. गेल्या वर्षी सर्वांच्या सहभागामुळे ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी झाला होता. यावर्षी देखील १३ ते १५ आॅगस्ट २०२३ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. भारतीय सर्वत्र राष्ट्रध्वज फडकवू शकतात आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून ‘हर घर तिरंगा’ संकेतस्थळावर अपलोड करू शकतात. (harghartiranga.com).या देशव्यापी मोहिमेचा तपशीलhttps://yuva.gov.in/meri_maati_mera_desh या पोर्टलवर पाहता येईल. पोर्टलवर केवळ ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेतील विविध उपक्रमांची संबंधित माहिती नसून, तरूण या वेबसाईटवर सेल्फी आणि रोपे लावण्यासारखे उपक्रम अपलोड करून या पोर्टलद्वारे मोहिमेत सामील होऊ शकतात.

तरुणांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होण्याचे तसेच आपल्या शूरवीरांना आणि आपल्या मातृभूमीला आदरांजली वाहण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीच्या इतर डिजिटल व्यासपीठाद्वारे ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेचे प्रसारण केले जाणार आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ मोहीम ९ आॅगस्ट रोजी सुरू होईल आणि १५ आॅगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित कार्यक्रमांसह चालणार आहे. त्यानंतरचे कार्यक्रम १६ आॅगस्ट २०२३ पासून गट, नगरपालिका/ नगरपरिषद आणि राज्य स्तरावर होतील. ३० आॅगस्ट २०२३ रोजी कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे समारोप समारंभ होणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन ‘वीरांना’ श्रद्धांजली.

रवि गिते जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.