भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला मा. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यावर आपण या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले होते. आज न्यायालयाच्या निकालाला अनुसरून लोकसभा सचिवालयाने राहुलजी गांधी यांची खासदारकी बहाल केली आहे. ही भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाही, व सुडबुद्धीच्या राजकारणाला मोठी चपराक आहे असे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. हा लोकशाहीचा विजय असून हुकुमशाहीचा पराभव आहे. राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल करण्याच्या लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाचे स्वागत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हा परिषद चौक येथे आतिषबाजी करून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जी. प. अध्यक्ष गंगाधर जिभाकटे जी, प्रदेश महासचिव जिया पटेल, महिला जिल्हाध्यक्ष सौ जयश्री ताई बोरकर, सभापती रमेश पारधी, मदन रामटेके, स्वाती वाघाये, युवक जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, प्रेमसागर गणवीर, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, राजू निर्वान, राजेश हटवार, कविता उईके, पूजा हजारे, प्रेम वनवे, शीतल राऊत, गजानन झंजाळ, विकास राऊत, प्रशांत देशकर, अनिक जमा, , धनंजय तिरपुडे, मनीषा निंबार्ते, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते,