पद भरती परीक्षा शुल्क कमी करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राज्य शासनाने विविध प्रशासकीय विभागातंर्गत काढलेल्या पद भरती परीक्षेत केलेली शुल्क वाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी आज, २४ आॅगस्ट रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे जिल्हा शाखेतर्फे निवेदनातून अप्पर जिल्हाधिकाºयांना करण्यात आली आहे. निवेदनानुसार, प्रशासकीय कामात गतिमानता यावी व नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध प्रशासकीय विभागातंर्गत पद भरती प्रक्रिया सुरु केली आह शासनाच्या या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्वागत करते. मात्र या पद भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाºया परीक्षेत सहभागी होण्याकरिता आकारलेल्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. ही शुल्कवाढ सर्वसामान्य व गरीब युवावगार्साठी आर्थिकदृष्ट्या अडचणीची ठरत आहे. पद भरती परीक्षा शुल्क वाढ कमी करण्यात यावी. या मागणीचे निवेदन अभाविपचे गोंदिया-भंडारा विभाग संयोजक अतुल कावळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *