उपमख्यमत्री फडणवीसाच्या आश्वासनानतर शतकºयाच ठिय्या आदोलन माग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : धानाचे थकीत चुकारे तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर सोमवारपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर शेतकºयांनी २९ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजता अखेर मागे घेतले.आंदोलक शेतकºयांच्या उपस्थितीत आमदार विनोद अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एक संदेश पाठवला. त्यात धानाचे थकीत चुकारे लवकरच दिले जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. याचबरोबर आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न पुरवठा मंत्री, पणन महासंघाचे प्रधान सचिव, ुंू‘महासंघाचे प्रशासकीय संचालक यांच्याशीही चर्चा केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकºयांना तत्काळ धान विक्रीचे पैसे देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश दिले व लवकरच धानाची रक्कम देण्याचा निर्णय घेऊन शासन शेतकºयांना न्याय देईल, असे आश्वासन दिले. ४ सप्टेंबरपर्यंत थकीत चुकारे शेतकºयांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे शेतकरी दीपक कानसरे यांनी सांगितले. शेतकरी उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतात. अशा कष्टकरी शेतकºयांच्या उत्पादनाची नासाडी करणे हे सोसायटी चालकांचे मोठे पाप आहे. या प्रकरणातील दोषी संचालकांची लवकरात लवकर चौकशी करून त्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे पैसे परत मिळेपर्यंत आपण त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचे आ.विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *