भंडारा : काँग्रेस खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या ‘भारत जोडो ‘ यात्रेचा विचार महाराष्ट्रातील घराघरांत पोचविण्यासाठी तसेच केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील ईडी सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याकरीता काँग्रेसतर्फे जनसंवाद पदयात्रेला काल दि.३ सप्टेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात शुभारंभ करण्यात आला. आज दुसºया दिवशी काँग्रेसची ‘जनसंवाद पदयात्रा’ गणेशपुर येथे पोहचली असता तेथील नागरीकांनी पदयात्रेचे उत्स्फुर्त स्वागत केले.. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव पवन मस्के यांनी नागरिकांशी संवाद साधत महागाई,बेरोजगारी, स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांवर त्यां चर्चा केली.यावेळी यावेळी काँग्रेसचे प्रामुख्याने मार्गदर्शक माजी अध्यक्ष काँग्रेस कमिटी प्रेमसागर गणवीर, तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, इंटक अध्यक्ष धनराज साठवणे, प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक अनिक जमा पटेल, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष अजबले, प्रेम वणवे जि. प. सदस्य,राजकपूर राऊत , अनिता भुरे ,जिल्हा सचिव मंगेश हुमणे, महेंद्र वाहाने,जगदीश उके , भावेश नागपुरे, स्वाती हेडाऊ, सुनील सार्वे रिजवान काँझी, संदेश शामकुवर , बाबुलाल राखडे ,सुनील सार्वे शिशुपाल हुमणे ,ओमकार शेंद्रे , राजकुमार सार्वे , आनंद महाकाळकर, गणेश ठवकर , राधे भोंगाडे ,गजानन मेहर, इम्रान पटेल , नम्रता बागडे, यांच्यासह गणेशपूर क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.