भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यात माहिती, शिक्षण आणि संवादासाठी सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ च्या नियोजीत जिल्हास्तरीय मोहिमेचा आढावा सम्राट राही, (भारतीय महसूल सेवा) उपाध्यक्ष जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट यांनी आज नियोजन सभागृहात घेतला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विवेक बोंद्रे यांनी यावेळी सादरीकरण केले. तसेच योजनाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यामध्ये भारत सरकारच्या μलॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत यादृष्टीने केंद्र शासनाने ही यात्रा आयोजित केली आहे. अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने या माहिती, शिक्षण व संवाद मोहिमेचे आयोजन जिल्हयात करण्यात येणार आहे.‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या नावाची देशव्यापी मोहीम १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत आखण्यात आली आहे. ही यात्रा जिल्हयात येणार आहे.त्यासंबंधीचे आयोजन व तयारीचा आढावा श्री.राही यांनी घेतला. तसेच त्यांनी उमेद,आवास योजना,व अन्य योजनांच्या लाभार्थ्यांशी ही संवाद साधला.