
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : (शिक्षण हक्क कायदा) २५% अंतर्गत पहिल्या फेरीत माडगी येथील एका शाळेत निवड झालेल्या ६ गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे प्रवेश तुमसरच्या गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे आणि पडताळणी समितीकडून नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात फळएआणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी थेट जिल्हा परिषदेकडे अपील दाखल केले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत भंडारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी निर्मला माने यांनी येत्या ९ जून २०२६ रोजी दुपारी १२.००वाजता विशेष सुनावणी आयोजित केली असून, तुमसरच्या गटशिक्षणाधिकाºयांना संपूर्ण दस्तऐवजांसह पाचारण केले आहे.