शेतकºयांच्या चक्काजाम आंदोलनाला यश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: – वैनगंगा नदीच्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करणाºया विमा कंपनी विरोधात ५ सप्टेंबरला चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. विमा कंपनीने पुढाकार घेऊन ताबडतोब अर्ज भरुन दिल्याने शेतकºयांची समस्या सुटली. खमाटा/टाकळी येथे पुरामुळे शेतकºयांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. सदर नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने कोणतीही प्रक्रिया केली नाही.पिकविमा कंपनीच्या अधिकाºयांनी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या आदेशाचे पालन न केल्याने संतप्त शेतकºयांनी ५ सप्टेंबरला अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात पुनर्वसन नवीन गावठाण कोथुर्णा रोड येथे चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरले होते. हे लक्षात येताच तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी पंतप्रधान पिकविमा कंपनीचे कर्मचारी, वरठी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मेश्राम, अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे व विष्णुदास लोणारे यांची संयुक्त बैठक घेतली. कृषी अधिकारी भंडारा यांनी पिकविमा कंपनीच्या कर्मचाºयांना घटनास्थळी पाठवून फॉर्म भरण्यासाठी शिबीर लावले. चक्काजाम आंदोलनाच्या ठिकाणीच उपस्थित सर्व १५० शेतकºयांचे पिकविमा अर्ज भरून दिले. शेतकºयांनी समाधान व्यक्त केल्याने समितीच्यावतीने पोलिस ठाणेदार मेश्राम यांना निवेदन दिले. यावेळी कोठीराम पवनकर, पुरूषोत्तम गायधने, विनोद भोपे, रतीराम भेदे, प्रकाश भोपे, अशोक पवनकर, योगेश गायधने, राधेश्याम आस्वले उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *