भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तिरोडी ते कटंगीदरम्यान नवीन रेल्वेमार्गाचे बांधकाम २०२० मध्ये पूर्ण झाले. कोट्यवधी रुपये खर्च करून रेल्वेमार्गाचे बांधकाम करण्यात आले; परंतु अद्यापही या रेल्वे मार्गावरून प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही प्रवासी रेल्वे गाड्या का सुरू करण्यात का आल्या नाहीत?, असा प्रश्नप्रवाशांना पडला आहे. तुमसर ते तिरोडी हा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग आहे, तिरोडी ते कटंगीचे अंतर १५ किलोमीटर असून येथे रेल्वे मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकाम २०२० मध्ये पूर्णझाल्यानंतर २०२१ पर्यंत रेल्वे मागार्ची चाचणी घेण्यात आली; परंतु अद्यापही या मार्गावर प्रवासी रेल्वे गाड्या धावत नाहीत.
पॅसेंजर बंदने प्रवाशांमध्ये असंतोष
कोरोना कालखंडात तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. तिरोडी ते इतवारी पॅसेंजर गाडी या मार्गावर पूर्वी सुरु होती; परंतु तीन वर्षापासून ती बंद आहे.