भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा.या घटनेला आता ३५० वर्षे पूर्ण झाली. ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राजमुद्रा ग्रुप तुमसर तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्ण देशामध्ये मध्ये हा सोहळा मोठा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पूजा करत २१ लिटर दुधाचे अभिषेक करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजमुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर सागर गभने, सागर भुरे, शुभम बाणासुरे, योगेश आजापुजे, राहुल रनदिवे, स्वप्निल डुंबरे, अनुप तिडके, श्रुती कावळे, संकेत गजबिये, अर्पित खानोरकर दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा राजमुद्रा ग्रुप तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती उपस्थित होते.