अमरावती : गेल्या दोन दशकापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काँग्रेसची सत्ता होती. परंतु, काल २४ जुलै रोजी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसची तीन मते फुटली. या निवडणुकीतही खोक्यांचा इफेक्ट स्पष्टपणे दिसून आला. ऐनवेळी दगा फटका करणाºयांना शेतकरी माफ करणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली.