भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाºयांसह पोलिस कर्मचाºयांवर राज्य शासनाने कारवाई केली. ही कारवाई एकतर्फी असून ती मागे घेण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस बॉईज असोेसीएशनच्या वतीने शेकडोंच्या संख्येने सोमवारी (ता. १८) मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ल्याची घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यात अनेक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. एवढे होऊनही कोणत्याहीलोकप्रतिनिधींनी किंवा नेत्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पोलिसांची साधी चौकशी केली नाही. उलट लाठीहल्ल्याप्रकरणी पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या लाठीहल्ला प्रकरणी योग्य प्रकारची चौकशी न करता पोलिसांवर एकतर्फी कारवाई करुन पोलिसांचे मनोबल कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिस विभाग हा समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक असून त्यांचे मनोबल खच्ची केले जात आहे. त्यामुळे जालना येथील पोलिसांवर करण्यात आलेली कारवाई रद्द करुन त्यांचे निलंबन मागे घेवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.
यासह सेवानिवृत्त होणाºया पोलिस अधिकारी, कर्मचाºयांना सेवानिवृत्तीच्या वेळी त्वरीत सेवानिवृत्तीचे संपूर्ण लाभ देण्यात यावे. पोलिस शिपाई ते पोलिस हवालदार, पोलिस हवालदार ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षक अशा आश्वासीत प्रगती योजनेमध्ये पदोन्नत्तीची साखळी लाभ पोलिस अंमलदारांना अनुज्ञेय झालेला आहे. ज्या पोलिस कर्मचाºयांचे सेवेचे ३० वर्ष पूर्ण झाले अशा सेवानिवृत्त कर्मचाºयांना तसेच कार्यरत पोलिस कर्मचाºयांना त्यांची ३० वर्ष सेवा पूर्ण झाल्याच्या तारखेपासून पोलिस उपनिरीक्षक या पदाची काल्पनिकवेतनवाढ देवून (एस-१४) या वेतनश्रेणीप्रमाणे सुधारणा करावी आणि न्यांना देय असलेली फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन भंडारा कार्याध्यक्ष गजानन भोवते, उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी शिखर संस्था उपाध्यक्ष ओंकार प्रसाद श्रीवास, पोलिस बॉईज संघटना भंडारा अध्यक्ष जयराम बावणे, महिला अध्यक्ष मडावी यांच्या नेतृत्वात गांधी चौक ते त्रिमुर्ती चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात जयदेव नवखरे, रविकांत लांजेवार, शशिकांत हट्टेवार, अब्दुल सहीद शेख , लियाकत खान, मनोज मेश्राम, जगनाडे, ठोंबरे, माधव वनवे, ईश्वरकर, कानेकर, राजकुमार बौद्ध, माणिक घोडीचोर, रिद्धेश्वर थोटे आणि सेवानिवृत्त तसेच पोलिस बॉईज संघटनेचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते.